तमिळनाडू सरकारच्या कायदा-सूव्यवस्था धोक्याच्या भीतीचे खंडन करत न्यायालयाने मंदिराला (Karthigai Deepam) कार्तिगाई दीपम उत्सवात दीपप्रज्वलित करण्यास मुभा दिली आहे.मदुराई खंडपीठाने तमिळनाडू सरकारच्या अपीलला फेटाळले आणि १ डिसेंबर २०२५ च्या एकल न्यायमूर्ती GR स्वामीनाथन यांच्या आदेशाला बळकटी दिली. अरुलमिगु सुब्रमण्या स्वामी मंदिराला तिरुपरंकुंड्रम डोंगरावर असलेल्या डोंगरटॉप खांबावर दीपप्रज्वलित करण्याची परवानगी कायम राहिल. न्यायालयाने सरकारच्या कायदा व सुव्यवस्था धोक्याच्या युक्तिवादाला तथ्यहीन ठरवले आणि १९२० च्या न्यायिक निर्णयाचा हवाल्याने हा खांब मंदिराचा आहे असे स्पष्ट केले.

Karthigai Deepam बाबत सरकारच्या भीतींवर परखड भाष्य
न्यायमूर्तींनी निरीक्षण नोंदवले की, “एक दिवसासाठी मंदिर प्रतिनिधींना आणि भक्तांना खड्ड्यावर दिवा लावण्यास परवानगी देणे हे सार्वजनिक शांततेला धोका कसे ठरेल हे समजायला अवघड आहे.” त्यांनी असा धक्का फक्त राज्याने पाठिंबा दिल्यासच होऊ शकतो असे सांगितले. DMK सरकारला राजकीय हेतू साधण्यासाठी अशा पातळीवर न उतरण्याचा सल्ला देत, कायदा-सूव्यवस्था धोका हा “काल्पनिक भूत” असल्याचे म्हटले. एका समुदायाला दुसऱ्याविरुद्ध भिडवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही नमूद केले.
Karthigai Deepam उत्सवासाठी स्पष्ट सूचना
न्यायालयाने पुढील कार्तिगाई दीपम उत्सवासाठी फक्त मंदिराच्या देखरेखीखालील टीमला दीप प्रज्वलन करण्यास परवानगी दिली. स्मारकांचे संरक्षण आणि शांतता राखण्यासाठी ही अट घातली असून, उंचावर प्रज्वलित दिवे भक्तांना दूरवरून दर्शन देण्यास सक्षम असल्याचे सांगितले. राज्याने राजकीय कारणांसाठी अशा वादांना प्रोत्साहन देऊ नये, अशी इच्छा न्यायालयाने व्यक्त केली.
Karthigai Deepam भक्तीचे अधिकार संरक्षित
या निर्णयाने लॉर्ड मुरुगाचे भक्त आणि मंदिर समर्थकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. DMK सरकारने सत्तेचा गैरवापर थांबवावा आणि कायद्याचे पालन करावे, अशी अपेक्षा आहे. तिरुपरंकुंड्रम मंदिरातील कार्तिगाई दीपम ही प्राचीन परंपरा आता न्यायालयीन बळकटीने सुरक्षित झाली आहे.
कार्तिकै दीपम काय आहे ?
कार्तिकै दीपम हा दक्षिण भारतात, विशेषतः तमिळनाडूत साजरा केला जाणारा एक प्रसिद्ध हिंदू सण आहे. हा सण कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो आणि यावेळी घरांमध्ये व मंदिरांमध्ये असंख्य दिवे लावले जातात. कार्तिकै दीपमाला “दिव्यांचा सण” म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी भगवान शिवाने अरुणाचल पर्वतावर ज्योतिस्वरूप धारण केला, अशी श्रद्धा आहे. माध्यरात्रीच्या वेळेस तिरुवन्नामलाई मंदिरातील गिरीवर मोठा दीप प्रज्वलित करण्यात येतो, जो अत्यंत पवित्र मानला जातो. या सणादरम्यान लोक आपली घरे स्वच्छ करतात, तैलाचे दिवे पेटवतात आणि देवतेची आराधना करून आनंद व्यक्त करतात. कार्तिकै दीपम हा प्रकाशाचा अंधारावर विजयाचे प्रतीक आहे. कार्तिकै दीपम हा श्रद्धा, एकत्रिकता आणि ईश्वरभक्तीचे दर्शन घडवतो.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
