पंतप्रधान (Narendra Modi) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या २५ वर्षांची सुरूवात : गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला आज २४ वर्षे पूर्णगुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ ऑक्टोबर) आपल्या नेतृत्वाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा साजरा केला. २००१ च्या याच दिवशी त्यांनी प्रथमच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्या घटनेनंतर आज म्हणजेच २०२५ मध्ये नरेंद्र मोदींनी सरकारप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारण्याचे २५वे वर्ष गाठले आहे. पंतप्रधान मोदींनी या निमित्ताने आपल्या ‘एक्स’ (माजी ट्विटर) खात्यावरून नागरिकांना संदेश दिला. त्यांनी लिहिले की, “२००१ मध्ये आजच्या दिवशी मी प्रथमच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. माझ्या सहकारी भारतीयांच्या सततच्या आशीर्वादामुळे मी शासनाच्या प्रमुखपदी २५व्या वर्षात प्रवेश करत आहे. भारतातील जनतेच्या विश्वास आणि प्रेमाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. या सर्व वर्षांत माझे एकमेव ध्येय हेच राहिले की आपल्या लोकांचे जीवनमान उंचावावे आणि आपल्या महान राष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र कार्य करावे.”

Narendra Modi
२००१ ते २०१४ या काळात (Narendra Modi) नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आणि त्यांच्या कार्यकाळात राज्यात औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा आणि शासन व्यवस्थेतील सुधारणा घडून आल्या. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा हाती घेतली आणि त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमतासह केंद्रात सत्तारोहण केले.
आज ७ ऑक्टोबर २०२५ रोजी मोदी यांच्या या दीर्घ प्रवासाला २४ वर्षे पूर्ण झाली असून, त्यांनी राष्ट्रसेवेच्या २५व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने पायाभूत विकास, तंत्रज्ञान, परराष्ट्र धोरण आणि जागतिक मंचांवर आपले स्थान बळकट केले आहे.
भारतीय जनतेकडून पंतप्रधान मोदींना या प्रसंगी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, तर अनेकांनी सोशल मीडियावर “मोदींच्या २५ वर्षांच्या सेवेला सलाम” असा संदेश दिला आहे.
Narendra Modi नरेंद्र मोदींच्या २००१ ते २०२५ या काळातील प्रमुख कामगिरी
Narendra Modi मुख्यमंत्री असताना (२००१-२०१४)
मोदींच्या या २५ वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय राजकारण आणि प्रशासनात फार मोठा बदल झाला असून, त्यांचा प्रभाव देशाच्या प्रत्येक भागात दिसून येतो. त्यांनी Gujarat पासून सुरुवात करून पूर्ण भारताचा विकासात्मक प्रवास राबविला आहे.
- २००१ मध्ये गुजरातमध्ये घडलेल्या प्रचंड भूकंपानंतर राज्याचा वेगवान पुनर्निर्माण केला.
- पाणी आणि वीजेच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी “ज्योतिग्राम योजना” राबवली, ज्यामुळे शेतकऱ्यांना स्वतंत्र विजेची सोय झाली.
- गुजरातमध्ये उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देऊन “वाइब्रंट गुजरात” परिषद आयोजित केली जिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली गेली.
- कृषी उत्पादनात वाढीसाठी विविध उपाययोजना आणि स्थानिक पायाभूत सुविधा घडवून आणल्या.
- भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कारवाई केली व प्रशासनात सुधारणा घडवून आणल्या.
Narendra Modi पंतप्रधान असताना (२०१४-२०२५)
- स्वच्छ भारत अभियान: संपूर्ण देशात स्वच्छता सुधारण्यासाठी आणि खुले शौच मुक्तता ध्येय साध्य करण्यासाठी मोठे उपक्रम राबवले.
- डिजिटल इंडिया: डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सरकारी सेवा लोकांपर्यंत पोहोचविल्या.
- मेक इन इंडिया: देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले.
- प्रधानमंत्री जनधन योजना: करोडो नागरिकांचे बँक खाते उघडून आर्थिक समावेशाला चालना दिली.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना: ग्रामीण भागातील गरजूंना मोफत एलपीजी कनेक्शन दिले, ज्यातून खासकरून महिलांना फायदा झाला.
- देशातील कर व्यवस्था सुधारण्यासाठी वस्तू व सेवा कर (GST) लागू केला.
- जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा (आर्टिकल 370) समाप्त करून संपूर्ण देशात एकसंध प्रशासन आणले.
- कोविड-१९ महामारीमध्ये भारताला वेगवान लस वितरण यशस्वी पद्धतीने राबवले.
- महिला सशक्तीकरणासाठी विविध योजना सुरु केल्या.
- भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मजबूत केले, अनेक देशांमध्ये उच्चस्तरीय भेटी आणि धोरणात्मक भागीदारी वाढवली.
- हरित ऊर्जा क्षेत्रात प्रगती साधली, भारताने युनायटेड नेशन्स नेतृत्व पुरस्कार प्राप्त केले.
- वन नेशन, वन इलेक्शन या संकल्पनेवर काम केले.
पंतप्रधान मोदींच्या कार्यावर आधारित इंटरनेटवरील डाकूमेंटरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मोदींची समाज माध्यमावरील पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
World Para Athletics Championships भारताच्या पॅराऍथलेटिक्स संघाची ऐतिहासिक कामगिरी!
