भारतीय लष्कर आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या स्थलीय दलांचे कमांडर मेजर जनरल यूसुफ मायूफ सईद अल हालामी (Major General Yousef Maayouf Saeed Al Hallami) यांच्या भारत दौर्यानिमित्त साउथ ब्लॉक येथे त्यांना औपचारिक ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. या समारंभात भारतीय लष्कराच्या तीनही दलांचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या (Additional Directorate General of Public Information) च्या माहितीनुसार, या भेटीमुळे भारत आणि UAE या दोन्ही देशांतील लष्करी संबंध आणि रणनीतिक सहकार्य आणखी सखोल होईल. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील भारत – संयुक्त अरब अमिरात संबंध हे केवळ आर्थिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून आता संरक्षण आणि सामरिक सहकार्याच्या नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. दोन्ही देशांदरम्यान नियमित संयुक्त सैन्य सराव, प्रशिक्षण विनिमय, तसेच संरक्षण उद्योगातील भागीदारी याद्वारे परस्पर विश्वास आणि आदराची भावना अधिक मजबूत झाली आहे.

India – UAE संबंध दक्षिण आशिया आणि अरब उपखंडातील सामरिक संतुलनाचा एक महत्त्वपूर्ण संकेत
भारतीय लष्कराने संयुक्त अरब अमिराती (यूएई) (UAE) भूसेनेचे कमांडर मेजर जनरल युसेफ मायूफ सईद अल हलामी यांना दिलेला औपचारिक गार्ड ऑफ ऑनर हा केवळ द्विपक्षीय कार्यक्रम नसून, दक्षिण आशिया आणि अरब उपखंडातील सामरिक संतुलनाचा एक महत्त्वपूर्ण संकेत मानला जात आहे. भारत आणि यूएई यांच्यातील संरक्षण सहकार्य गेल्या काही वर्षांत उल्लेखनीयरीत्या वाढले आहे. दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांमध्ये माहिती देवाणघेवाण, सायबर सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाई आणि सागरी सुरक्षेसंबंधी समन्वय या क्षेत्रांत सक्रिय भागीदारी झाली आहे.
या भेटीद्वारे दोन्ही देशांनी जागतिक सुरक्षेतील उभरत्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी आणि परस्परावलंबी सहकार्याची वचनबद्धता दर्शवली. विशेषतः पर्शियन गल्फ प्रदेश आणि भारतीय महासागरातील सागरी मार्गांचे संरक्षण या दृष्टीने भारत-यूएई सहकार्याला जागतिक कूटनीतीत महत्त्व आहे. संयुक्त सराव, प्रशिक्षण कार्यक्रम आणि लष्करी तंत्रज्ञानातील देवाणघेवाण या माध्यमांतून दोन्ही राष्ट्रांचे संरक्षण संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. या भेटीमुळे भारताने पश्चिम आशियातील आपली उपस्थिती अधिक दृढ केली असून, यूएईनेही आशिया-प्रशांत क्षेत्रात भारताला महत्त्वाचा रणनीतिक भागीदार म्हणून स्थान दिले आहे.
पाकिस्तान सौदी अरब संबंध
दुसरीकडे, सप्टेंबर २०२५ मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांनी स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अॅग्रीमेंट (Strategic Mutual Defense Agreement) केला, ज्यामध्ये एखाद्या देशावर झालेला हल्ला दोन्ही देशांवर झालेला म्हणून मान्य केला जाणार आहे. हा करार पाकिस्तानसाठी आर्थिक, लष्करी आणि भूराजकीय फायदे घेऊन आला असून या करारामुळे भारताच्या संरक्षण धोरणाला आव्हान निर्माण झाले आहे, त्यामुळेच भारताने याकडे सावधगिरीने पाहिले आहे आणि आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. तसेच पश्चिमी देश आणि मध्यपूर्व राष्ट्रांच्या वाढत्या रणनीतिक गठबंधनांच्या पार्श्वभूमीवर INDIA- UAE ही द्विपक्षीय भेट भारताच्या स्वतंत्र आणि संतुलित परराष्ट्र धोरणाचे प्रतीक मानली जात आहे.
समाज माध्यम साईट “X” वरील ADGI यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट:
सऊदी अरब आणि पाकिस्तान (Pakistan Saudi Arabia) यांच्यात नाटोसारखा सामरिक संरक्षण करार !
