(World Bamboo Day) आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत बांबू परिषद आयोजित !

Vishal Patole
World Bamboo Day

(World Bamboo Day) आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त महाराष्ट्रात मुंबईत १८ आणि १९ सप्टेंबर २०२५ रोजी दो दिवसांची विशेष बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) आणि फिनिक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात करण्यात आले आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रि एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देणे असा या परिषदेचा उद्देश आहे.

World Bamboo Day

World Bamboo Day – बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी :

बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी : ग्रीन गोल्ड, ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम पर्यावरणीय संकटांना तोंड देण्यासाठी आणि बांबूमुळे रोजगारनिर्मिती तसेच आर्थिक विकास घडवण्यासाठी महत्त्वाचा आहे. परिषदेअंतर्गत बांबूपासून बनवलेल्या विविध उत्पादनांबाबत सखोल चर्चाही होणार असून, यात इथेनॉल, मिथेनॉल, थर्मल साठी बांबू पॅलेट्स, चारकोल, लाकूड, फर्निचर आणि बांबू कपड्यांचा समावेश आहे.

याशिवाय, शहरी वनीकरण, ऑक्सिजन पार्क, ग्रीन बिल्डिंग अशा नवकल्पना देखील परिषदेत सादर केल्या जातील. दुसऱ्या दिवशी राज्य शासनाचे प्रतिनिधी, अभ्यासक आणि उद्योजक यांच्यात गोलमेज परिषद होऊन २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात बांबू लागवड वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नैसर्गिक आपत्ती टाळणे आणि वनक्षेत्र वाढवणे हे देखील शासनाचे ध्येय आहे.

बांबूला “हरित सोने”, “हरित ऊर्जा” व “हरित पृथ्वी” अशी ओळख देणाऱ्या या चलनशील परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ, उद्योजक, शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी आणि पर्यावरणीय समाधानासाठी एक मोठा बदल घडवून आणणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

World Bamboo Day निमित्त

बांबूचे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे फायदे आहेत. बांबू ही जलद वाढणारी वनस्पती असून ती केवळ 3 ते 5 वर्षांत परिपक्क्त होते, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर आणि गरीबीतून मुक्त करणारे उत्पन्न मिळते. कमी पाण्याचा आणि देखभालीचा खर्च असलेली बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. हे पीक डोंगर उताराच्या जमिनीसाठीही उपयुक्त असून, जलसंधारणास मदत करते.

बांबूची शेती उच्च उत्पन्नाचा मार्ग आहे कारण आज त्याचा वापर फर्निचर, बांधकाम, कागद, खाद्यपदार्थ, इथेनॉल, मिथेनॉल, टुथब्रशपासून चप्पल पर्यंत विविध उद्योगांमध्ये होतो. सरकारद्वारे शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आर्थिक अनुदानही दिले जात आहे, ज्यामुळे अधिक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. याशिवाय, बांबू लागवडेमुळे जमिनीची धूप कमी होते आणि पर्यावरण संरक्षण होतो.

या सर्व कारणांमुळे बांबू शेतकऱ्यांसाठी नवीन रोजगार आणि भरवशाचे उत्पन्न देणारे पीक ठरले असून, महाराष्ट्र सरकारही याला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे बांबू लागवड वाढवून शेतकऱ्यांचे आर्थिक सुदृढीकरण आणि पर्यावरणीय सुधारणा दोन्ही शक्य होतात.

(World Bamboo Day) आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समाज माध्यम साईट “x” वरील पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

सऊदी अरब आणि पाकिस्तान (Pakistan Saudi Arabia) यांच्यात नाटोसारखा सामरिक संरक्षण करार !

Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
प्रतिक्रिया नाहीत

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत