उपमुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदेंचे (Rahul Gandhi) राहुल गांधींना जोरदार आव्हान !

Vishal Patole
Eknath Shinde, Rahul Gandhi)

ठाण्यातील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते (Rahul Gandhi) राहुल गांधींवर जोरदार टीका केली. शिंदेंच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी केवळ फेक नॅरेटिव्ह पसरवण्याच्या कामात गुंतले आहेत, पण ते कोणतेही ठोस पुरावे किंवा शपथपत्र देत नाहीत. “संभ्रम निर्माण करून लोकांना दिशाभूल करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत,” अशी आरोप त्यांनी केले. शिंदे म्हणाले, “जर राहुल गांधींकडे खरे पुरावे असतील, तर त्यांना ते निवडणूक आयोगाला किंवा संबंधित न्यायालयात सादर करायला हवेत. बोलण्यात तथ्य असेल तर न्यायालयात जावे, अन्यथा फक्त आरोप करत राहणे योग्य नाही.”

Eknath Shinde

Eknath Shinde यांच्या सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखील राहुल गांधींचा टोला लगावला. ते म्हणाले की, राहुल गांधीांनी हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा दावा केला होता, पण प्रत्यक्षात लवंगी फटाका फोडू शकले नाहीत. “ही त्यांची खोटी वक्तव्ये असून, पुरावे देण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्यामुळे त्यांना गांभीर्याने कुणी घेत नाही,” अशी ठिणगी त्यांनी लगावली.

फडणवीस यांनी बिहारच्या निवडणुकीतही राहुल गांधींच्या या प्रकारच्या न करणाऱ्या वक्तव्यांनी काहीच फायदा होणार नाही, बिहार मोदींच्या बाजूने जाईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवामुळेच राहुल गांधी असे आरोप करत आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या या वक्तव्यानं राहुल गांधींवर निशाणा साधत राजकीय वाद पुन्हा एकदा तणावपूर्ण झाला आहे.

उबठा कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा प्रवेश

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उबाठा गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या समारंभात प्रमुख महिला पदाधिकारी नीलम म्हात्रे, मनिष पिंपळे, शैला कोलेकर, मनिषा पाटील, जमीला सय्यद, प्रीती मोरे, ललिता कोळी, तसेच अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचायत सदस्य आणि स्थानिक नेते उपस्थित होते. डहाणू तालुक्यातील माजी उपसभापती पिंटू गहला, काजल राबड, जयश्री करामोडा, सुरेंद्र राबड असे अनेकांनी देखील शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पालघर जिल्ह्याला सतत शिवसेनेचा आधार मिळत असल्याचे नमूद करत आगामी स्थानिक निवडणुकीतही पक्षाचा मोठा विजय सुनिश्चित होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांनी मुंबईच्या कोस्टल रोड विस्ताराचेही स्मरण करून दिले, ज्यामुळे भविष्यात वाहतुकीची समस्या कमी होईल असे सांगितले.

या पक्षप्रवेश कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, वैदेही वाढाण, सुशील चुरी, राहुल लोंढे आणि इतर कार्यकर्तेही कार्यरत होते.

हा मोठा पक्षप्रवेश शिवसेनेच्या वाढत्या लोकप्रियतेचे द्योतक आहे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्ष कटिबद्धतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

इन्टरनेट वरील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रेस कॉन्फरन्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :

व्हाईट हाऊसमधून ट्रम्प यांची मोदींशी (Modi Trump) मैत्रीची पुष्टी; भारत-अमेरिका संबंधांवर केला विश्वास व्यक्त तर मोदींनी देखील समाधान व्यक्त केले !

TAGGED:
Share This Article
Follow:
We work in the field of Blogging related to News on Entertainment, Sports, Bollywood, Education, Latest Updates on Science, News Related to Jobs and Recruitment, News on different Government Schemes
2 टिप्पण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत