महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din ) म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. ६ डिसेंबर रोजी दिल्लीत बाबासाहेबांची प्राण ज्योत मालवली त्यानंतर चैत्यभूमी मुंबई येथे दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ डिसेंबर १९५६ रोजी बौद्ध धर्म पद्धतीने त्यांचा अंतिमसंस्कार झाला कारण ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या मृत्युपुर्वीच त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता आणि बौद्ध धम्मानुसार महापुरुषांचे देहावसान हे सामान्य मृत्यू नसून त्यास “महापरिनिर्वाण” म्हंटल्या जाते आणि म्हणून दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन म्हणून जगभर पाळल्या जातो कारण याच दिवशी एक महान भारतीय समाजसुधारक, न्यायशास्त्रज्ञ , अर्थशास्त्रज्ञ , राजकीय नेता आणि बहुजन समाजाचा एक श्रेष्ठ आधारस्तंभ जगाने कायमचा गमावला होता.
- महामानवाचे बालपण आणि सुरुवातीचा काळ- (Mahaparinirvan Din विशेष )
- (Mahaparinirvan Din) महापरिनिर्वाण दिना अगोदर – “हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही” या महामानवाने घेतलेल्या वचनाची वचनपूर्ती.
- महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din)- ६ डिसेंबर १९५६
- चैत्यभूमी आणि महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din)
- Mahaparinirvan Din- महापरिनिर्वाण दिना अगोदर अखेरचा संदेश
- महापरिनिर्वाणा (Mahaparinirvan )अगोदर अखेरचे राजकीय भाषण
- महापरिनिर्वाणानंतर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे (Mahaparinirvan Din) निमित्त महामानवास सोशल मिडिया च्या माध्यमातून अभिवादन.
महामानवाचे बालपण आणि सुरुवातीचा काळ- (Mahaparinirvan Din विशेष )
आताच्या मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाणाऱ्या आणि तत्कालीन महू म्हणून ओळख असलेल्या शहर आणि लष्करी छावणी येथे डॉ. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ, जे इंग्रजी-भारतीय सेनेत सुभेदार या पदावर सैन्य अधिकारी होते आणि आई भीमाबाई सकपाळ या लक्ष्मण मुरबाडकर यांच्या कन्या होय. मालोजी आणि भीमाबाई यांचे भीमराव रामजी आंबेडकर हे १४ वे आणि शेवटचे अपत्य होते. बाबासाहेबांचे कुटुंब आजच्या आधुनिक महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंबाडवे ( मंडणगड तालुका ) या गावातील मराठी पार्श्वभूमीचे होते . आंबेडकरांचा जन्म एका महार (दलित) जातीत झाला होता, ज्यांना अस्पृश्य मानले जात होते आणि त्यांच्याशी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला जात होता. ते शाळेत जात असले तरी, आंबेडकर आणि इतर अस्पृश्य मुलांना वेगळे ठेवले जात असे आणि शिक्षकांनी त्यांच्या कडे केव्हाही विशेष लक्ष दिले नाही किंवा मदत दिली नाही. त्यांना वर्गात बसू दिले जात नसे. जेव्हा त्यांना तहान लागत असे तेव्हा उच्च जातीतील कोणीतरी ते पाणी उंचावरून यांच्या ओंजळीत ओतायचे कारण त्यांना पाण्याला किंवा त्यात असलेल्या भांड्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. हे पाणी ओतण्याचे काम सामान्यतः तरुण आंबेडकरांसाठी शाळेतील शिपायाकडून केले जात असे , आणि जर शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना तहानलेल्या मुखाने पाण्याशिवायच दिवस घालवावा लागे; त्यांनी नंतरच्या त्यांच्या लेखनात या परिस्थितीचे वर्णन “शिपाई नाही, पाणी नाही” असे केले . त्यांना एका गोणीवर बसण्यास मजबूर केले जात असे व तीच गोणी घरी नेऊन पुन्हा शाळेत परत आणण्यासाठी सांगितले जात असे. या सर्व घटनांचा बाबासाहेबांच्या बालमनावर अत्यंत खोलवर परिणाम झाला.
१८९४ मध्ये रामजी सकपाळ सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकुटुंब साताऱ्याला गेले. त्यांच्या या हालचालीनंतर काही वेळातच आंबेडकरांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर या लहान मुलांचा सांभाळ त्यांच्या मावशीने केला आणि त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत आपले बालपण घालविले. त्यांच्या भाऊ आणि बहिणींपैकी फक्त भीमरावांनीच त्यांची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते हायस्कूलमध्ये गेले. त्यांचे मूळ आडनाव सकपाळ होते पण त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव शाळेत अंबाडवेकर म्हणून नोंदवले कारण पूर्वी लोक आपल्या राहत्या गावाच्या नावावरून आपली आडनावे ठेवत असे, सकपाळ कुटुंब मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी ‘अंबाडवे ‘ येथे आले होते आणि आपल्या गावाच्या नावावरून त्यांनी आपल्या आडनावाची नोंद “अंबाडवेकर ” अशी केली होती. नंतर पुढे डॉ. बाबासाहेबांचे मराठी ब्राह्मण शिक्षक, कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी त्यांचे आडनाव ‘अंबाडवेकर’ वरून बदलून ‘आंबेडकर’ असे शाळेच्या नोंदींमध्ये ठेवले.
“माझे तीन गुरु आहेत.प्रत्येकाला गुरु असतात,तसे मलाही आहेत.मी काही संन्यासी नाही की बैरागी नाही ;पण माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध होय. माझी ठाम खात्री झाली आहे की, जगाचे कल्याण फक्त बौद्ध धर्मच करू शकेल. माझे दुसरे गुरु कबीर होय. माझे वडील कबीरपंथी होते.त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्वांचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्वज्ञानाचे खरे रहस्य कळाले होते.माझे तिसरे गुरु म्हणजे जोतिबा फुले होय. शिंपी, कुंभार, न्हावी,कोळी, महार, मांग, चाभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकवले.हे असे माझे तीन गुरु आहेत.यांच्याच शिकवणीने माझे आयुष्य बनले आहे.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर – पुरंदरे स्टेडियम,मुंबई, २८ ऑक्टोबर १९५४.
(Mahaparinirvan Din) महापरिनिर्वाण दिना अगोदर – “हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही” या महामानवाने घेतलेल्या वचनाची वचनपूर्ती.
हिंदू धर्मातील अनिष्ठ रूढी, उच्च नीचता, एका वर्गाचे धर्मावरील वर्चस्व व मक्तेदारी. एकीकडे जनावरांना देवत्व देणारी तर दुसरीकडे काही विशिष्ट समाजातील मागास व पिचलेल्या लोकांना माणूस म्हणूनही वागवण्यास तयार नसणारी तत्काकालीन हिंदू व्यवस्था जी मोठ्या संघर्षानंतर सुद्धा व्यवस्थेत बदल करण्यास तयार नव्हती त्यामुळे विनाकारण रिकामा वेळ दवडण्यापेक्षा, हजारो वर्षांपासून खितपत पडलेल्या उपेक्षित बहुजन समाजाला तत्काळ न्याय कसा मिळेल व त्यांचे मूळ नैसर्गिक, मानवीय आणि न्याय्य हक्क त्यांना पुन्हा कसे मिळवून देता येतील या विचारानेआणि तत्कालीन हिंदूंच्या नकारात्मक भूमिका व व्यवहारामुळे शेवटी नाईलाजाने आंबेडकरांना बहुसंख्य समाजाच्या हितासाठी त्यांना न्याय देऊ शकेल व मानव म्हणून त्यांचा विकास करू शकेल अश्या इतर धर्म पद्धतींचा अभ्यास सुरु केला. हिंदू समाजव्यवस्थेला वैतागून डॉ. आंबेडकरांनी वचन घेतले कि, “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही !” विविध धर्मांचे अध्ययन सुरु असतांना एकदा अंबेडकरांनी शीख धर्म स्वीकारण्याचा विचार केला , ज्याने दडपशाहीला विरोध करण्यास प्रोत्साहन दिले आणि म्हणून अनुसूचित जातीच्या नेत्यांना तसे आवाहनही केले. पण शीख नेत्यांच्या भेटीनंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला की कदाचित त्यांना “द्वितीय- दर्जाचा ” शीख दर्जा मिळेल जे बाबासाहेबांना मान्य होणे कदापि शक्य नव्हते म्हणून त्याऐवजी, सन १९५० च्या आसपास, त्यांनी बौद्ध धर्माकडे आपले लक्ष देण्यास सुरुवात केली.
त्यासाठी बाबासाहेबांनी बौद्धांच्या जागतिक फेलोशिपच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी सिलोन (आता श्रीलंका) येथे प्रवास केला. त्यानंतर पुण्याजवळ एक नवीन बौद्ध विहार समर्पित करताना , आंबेडकरांनी जाहीर केले की ते बौद्ध धर्मावर एक पुस्तक लिहित आहेत आणि जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा ते औपचारिकपणे बौद्ध धर्म स्वीकारतील. सन १९५४ मध्ये त्यांनी दोनदा बर्माला भेट दिली; रंगून येथे बौद्धांच्या जागतिक फेलोशिपच्या तिसऱ्या परिषदेत सहभागी होण्याची त्यांची दुसरी वेळ होती . त्यानंतर सन १९५५ मध्ये त्यांनी भारतीय बौद्ध महासभा, किंवा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली. सन १९५६ मध्ये, त्यांनी त्यांचे शेवटचे पुस्तक लिहून पूर्ण केले ज्याचे नाव होते, “द बुद्ध अँड हिज धम्म” जे आंबेडकरांच्या मरणोत्तर प्रकाशित झाले. श्रीलंकन बौद्ध भिक्खू हम्मालावा सद्धतिसा यांच्या भेटीनंतर, बौद्ध धर्मातील प्रवेश निश्तिच करून आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात स्वत:साठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी औपचारिक सार्वजनिक समारंभ आयोजित केला. पारंपारिक पद्धतीने बौद्ध भिक्खूकडून तीन शरण आणि पाच उपदेश स्वीकारून “बौद्ध धर्माचा” स्वीकार केला त्याबरोबरच आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याचा निश्चय आपल्या Mahaparinirvan Din (महापरिनिर्वाणाच्या ) काही दिवस अगोदर पूर्ण केला. त्यांचे स्वतःचे व त्यांच्या पत्नीसह धर्मांतर झाले, त्यानंतर त्यांनी सुमारे ४ ते ५ लाख समर्थकांचे “बौद्धात” रुपांतर केले जे त्यांच्याभोवती जमले होते आणि त्यांच्याकडे अपेक्षेन पाहत होते. तीन शरण आणि पाच उपदेशच नाही तर बाबासाहेबांनी या नवीन धर्मांतरितांसाठी इतर २२ नियम तयार केले होते. ज्याचा उद्देश नवीन बुद्ध अनुयायांनी बुद्ध तत्व व सिद्धांत योग्य पद्धतीने आणि योग्य भावनेने आत्मसात करून आत्मोन्नती व समाजोन्नती करून घ्यावी. व मग त्यानंतर चौथ्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी होण्यासाठी बाबासाहेब काठमांडू , नेपाळ येथे गेले.
महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din)- ६ डिसेंबर १९५६
महापरिनिर्वाण दिन- Mahaparinirvan Din हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आवर्जून पाळला जातो. अत्यंत धावपळीच्या व संघर्षपूर्ण जीवनशैली चे परिणाम म्हणून आपल्या आहाराकडे व आरोग्याकडे होणाऱ्या दुर्लक्ष्य यामुळे बाबासाहेबांना १९४८ साली मधुमेह जडला. या आजाराच्या इलाजासाठी म्हणून घेतल्या जाणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम आणि डोळ्यांच्या इतर समस्येमुळे डॉ. आंबेडकर जून ते ऑक्टोबर १९५४ पर्यंत अंथरुणाला खिळून होते. नंतर १९५५ मध्ये त्यांची तब्येत पुन्हा जास्त बिघडली. बुद्ध अँड हिज धम्माचे अंतिम हस्तलिखित पूर्ण केल्यानंतर तीन दिवसांनी, अंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील त्यांच्या घरी झोपेतच महापरिनिर्वाण (निधन) झाले.
आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) Mahaparinirvan झाले होते, त्यांच्या मृत्युच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. ज्यामध्ये लाखो शोकाकुल लोक उपस्थित होते. “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही” या आपल्या घेतलेल्या संकल्पसिद्धीसाठी बाबासाहेबांनी निधनाच्या केवळ दीड ते दोन महिन्यापूर्वी आपल्या लक्षावधी अनुयायांसह दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला, अशारितीने बाबासाहेब ‘बोधिसत्त्व’ झाले. आपल्या जीवन कार्यातून, बौद्धिक संपत्तीतून आयुष्यभर केवळ मानवतेसाठी लढणारे बाबासाहेब आंबेडकर हे खरेखुरे बौद्ध गुरू ठरले, त्यांनी खरा बौद्ध जाणला होता. ते खरेखुरे “बुद्ध” होऊन शेवटी “बुद्धातच” विलीन झाले यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी Mahaparinirvan –‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात येतो.
चैत्यभूमी आणि महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din)
(Mahaparinirvan Din) ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादर येथील राजगृहावर आणण्यात आले. त्यांनतर शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी ज्या जागेची ओळख केवळ हिंदू स्मशान भूमी अशीच होती परंतु काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर त्याजागी चैत्य उभारण्यात आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आदरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथे येऊ लागला आणि हि भूमी पवित्र अशी “चैत्यभूमी” झाली. चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क, मुंबई येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून लाखो लोकांचा समुदाय येण्यास सुरुवात होते. या जनसमूदायांची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेविका मोठ्या परिश्रमाने घेत असतात. दरवर्षी जवळपास २५ लाख व त्यापेक्षा अधिक अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात आणि प्रतिवर्ष हि संख्या वाढतच जात आहे कारण डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता “चैत्यभूमी स्मारक” हे निरंतर एक प्रेरणेचे स्थान कायमच बनून राहणार आहे.
७ डिसेंबर १९५६ रोजी दादर चौपाटी समुद्रकिनाऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्म पद्धतीने अंत्यसंस्काराचे आयोजन करण्यात आले होते , ज्यात लाखो लोक आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी साश्रुनयन व जडअंतकरनाणे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेबांची आपल्या अनुयायांकडून बौद्ध धर्मातील प्रवेशाबद्दल असलेली अपेक्षापूर्ती म्हणून १६ डिसेंबर १९५६ रोजी एक धर्मांतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांना त्याच ठिकाणी बौद्ध धर्मात रूपांतरित करण्यात यावे, अशाप्रकारे १६ डिसेंबर १९५६ रोजी लाखो लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी – Mahaparinirvan Dinएक तळपता सूर्य अस्त झाला असला तरी लाखो मनात आंबेडकरी विचारांच्या आणि बौद्ध धम्माच्या ज्योती पेटवून, त्यांना आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी लागणारी शक्ती व प्रेरणा देणारा प्रकाश चैत्यभूमीवर येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात सदैव उगम पावतो. म्हणूनच महामानवाच्या महापरिनिर्वाणा नंतर सुद्धा आंबेडकरी विचार आजही नुसते जिवंत नसून सतत,अखंड व अविरतपणे विस्तारपावत आहेत आणि बहुजन आपली ध्येय प्राप्तीकडे अग्रेसर होत आहेत. इ.स. २००२ पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती’ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य करत असते. २०१७ या वर्षी ६१व्या महापरिनिर्वाण दिनापासून , याठिकाणी १५ मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना करून, एकंदरीत संपूर्ण मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करता यावी असा महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्याचे ठरवले गेले आहे.
Mahaparinirvan Din- महापरिनिर्वाण दिना अगोदर अखेरचा संदेश
अनेक मुद्द्यांवर आंबेडकर आणि नेहरू यांच्यात मतभेत होते. तसेच पंतप्रधान नेहरू हे त्यांच्याशी मतभेत असलेल्या विचारवंतांचे म्हणणे ऐकावयास कधीही तयार नसायचे. अशा परिस्थितीत एकवेळी बाबासाहेब सुस्कारा टाकत म्हणाले “ज्या देशात पूर्वग्रहदुषित मनाचे लोग असतात त्या देशात जन्म घेणे हे मोठे पाप आहे, मला सर्व बाजूंनी शिव्या शाप खावे लागले.तरीही मी केलेले कार्य पुष्कळ मोठे आहे. मी माझे कार्य मृत्यू पर्यंत चालू ठेवीन असे म्हणून ते रडू लागले. एके दिवशी आपले सहकारी नानकचंद रत्तूंना ते म्हणाले –
महापरिनिर्वाणा (Mahaparinirvan )अगोदर अखेरचे राजकीय भाषण
नागपूरच्या शाम हॉटेल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पक्षातील लोकांची सभा घेतली तेव्हा त्यांनी म्हंटले कि-
महापरिनिर्वाणानंतर
आंबेडकर यांच्या पश्चात त्यांची दुसरी पत्नी सविता आंबेडकर (ज्यांना माईसाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाते), ज्यांचे २००३ मध्ये निधन झाले, आणि त्यांचा मुलगा यशवंत आंबेडकर (भैय्यासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाते), ज्यांचे १९७७ मध्ये निधन झाले. [सविता आणि यशवंत यांनी आंबेडकरांनी सुरू केलेली सामाजिक-धार्मिक चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यशवंत यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे दुसरे अध्यक्ष (१९५७ -१९७७ ) आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (१९६० -१९६६ ) म्हणून काम केले. त्यांच्या पश्चात पुढील पिढीत देखील डॉ आंबेडकरांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम सध्याच्या पिढीत आंबेडकरांचे थोरले नातू, प्रकाश यशवंत आंबेडकर चालू ठेऊन आहेत, ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे मुख्य-सल्लागार आहेत, तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व देखील करतात, याव्यतिरिक्त त्यांनी भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहात काम केले आहे. आंबेडकरांचे धाकटे नातू आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे नेतृत्व करतात.आंबेडकर यांचे २६ , अलीपूर रोड येथील त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये आता स्मारक उभारण्यात आले आहे. आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखली जाणारी त्यांची जन्मतारीख अनेक भारतीय राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून पाळली जाते. १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न , प्रदान करण्यात आला .
त्यांच्या जन्म आणि मृत्यूच्या म्हणजेच जयंती, महापरिनिर्वाणानिमित्त -Mahaparinirvan Din आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त (१४ ऑक्टोबर) नागपूर येथे आणि मुंबईतील त्यांच्या स्मृतीस्थळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो लोक जमतात. हजारो पुस्तकांची दुकाने उभारली जातात आणि पुस्तके विकली जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या अनुयायांना एक महत्वाचा संदेश होता “शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा !”
हक्क याचनेने नाही तर संघर्षाने मिळवावे लागतात, लक्षात ठेवा बकऱ्याचा बळी दिला जातो, सिंहाचा नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
