भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे केवळ काळाच्या चौकटीत अडकत नाहीत, तर ती पिढ्यान्पिढ्या प्रेरणा देत राहतात. अशाच तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे (Rajmata Jijau) राजमाता जिजाऊ, ज्यांना आपण प्रेमाने जिजामाता म्हणतो. त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माताच नव्हत्या, तर स्वराज्याच्या संकल्पनेची जननी होत्या. छत्रपती शिवरायांच्या मातोश्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या थोर स्त्रीने स्वराज्याचे स्वप्न बघून ते साकार करण्यासाठी आपल्या पुत्राला प्रेरणा दिली. आज त्यांच्या जन्म जयंती निमित्त त्यांच्या जीवनदर्शनातून आम्ही भारतीयांनी खरोखर काही आदर्श अंगीकारणे काळाची गरज आहे. आजच्या लेखात आपण “जिजामातेच्या” जीवनाबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सर्व भारतीयांना “स्वराज्य जननी – राजमाता जिजाऊ” यांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा !

(Rajmata Jijau) जिजामाता – एक आई, एक गुरू, एक राष्ट्रनिर्माती
(Rajmata Jijau) राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा जिल्हा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधवराव, हे पराक्रमी सरदार होते. बालपणापासूनच जिजामातांना शौर्य, स्वाभिमान आणि धर्मनिष्ठा यांचे संस्कार लाभले.
वयाच्या लहानशा काळात त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्या काळात स्त्रीचे जीवन अनेक बंधनांनी जखडलेले असताना, जिजामातांनी मात्र स्वतःच्या विचारांनी आणि धैर्याने वेगळा आदर्श घालून दिला. शाहूजी भोसले यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर त्या पुणेप्रदेशी आल्या आणि अस्थिर राजकीय वातावरणातही धैर्याने कुटुंब सांभाळले. त्या काळात मुगल आणि इतर शत्रूंच्या आक्रमणांमुळे रयत त्रस्त होती, यातूनच त्यांच्या मनात स्वराज्यासाठी बीज रोपले गेले
स्वराज्याची बीजे रोवणारी माता – (Rajmata Jijau)
(Rajmata Jijau) जिजामाता यांनी आपल्या पुत्र शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची संकल्पना रुजवली. रामायण, महाभारत, पुराणे आणि संतांचे विचार ऐकवून त्यांनी शिवाजी महाराजांना धर्म, नीती, न्याय आणि शौर्य यांचे धडे दिले. त्या त्यांना घोडेस्वारी, तलवारबाजी आणि शस्त्रविद्या शिकवत, तसेच “हिंदवी स्वराज्य” ही संकल्पना रुजवले.
“पराधीनतेत जीवन जगणे हे पाप आहे” हा विचार त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात ठासून भरवला. त्याचाच परिणाम म्हणजे शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
राजगडावरून घडले नेतृत्व
राजगडावर वास्तव्यास असताना जिजामाता यांनी केवळ मातृत्वाचीच नाही, तर राजकीय व प्रशासकीय जबाबदारीही समर्थपणे निभावली. शिवाजी महाराज मोहिमांवर असताना किल्ल्याचा कारभार, जनतेची काळजी आणि शिस्त राखण्याचे कार्य त्यांनी केले.
त्या काळात स्त्रीने किल्ल्याचे प्रशासन पाहणे ही मोठी गोष्ट होती, पण जिजामातांनी ती सहज करून दाखवली.
Rajmata Jijau : आदर्श स्त्रीशक्तीचे प्रतीक
Rajmata Jijau – जिजामाता या केवळ शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या स्त्रीशक्तीचे जिवंत प्रतीक होत्या. त्यांनी संकटांवर मात केली, अपमान सहन केला, पण कधीही स्वाभिमान सोडला नाही.
त्यांचे जीवन हे सांगते की:
- स्त्री कोमल असते, पण दुर्बल नसते
- आई मुलाला जन्म देते, पण घडवते ती संस्कारांनी
अखेरचा अध्याय
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचे सौभाग्य जिजामातांना लाभले.
परंतु १७ जून १६७४ रोजी, राज्याभिषेकानंतर काही दिवसांतच त्यांचे निधन झाले. स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारलेले पाहूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
निष्कर्ष – आजच्या पिढीसाठी संदेश
राजमाता जिजाऊ यांचे जीवन आजच्या पिढीसाठी एक मोठा संदेश देते:
- संस्कारांची ताकद किती मोठी असते हे आपणास जीजामातांनी जडण घडण केलेला महापुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पाहून समजते.
- आई राष्ट्र घडवू शकते – छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याकडे पाहून आपणास लक्षात येते कि एक आई अखंड राष्ट्र निर्माण करण्याचे सामर्थ्य ठेवते.
- मासाहेब जिजाऊ यांच्या जीवनपटातून आपणास स्वाभिमान, धैर्य आणि नीतिमूल्ये हीच खरी संपत्ती आहे हे लक्षात येते.
आजही जिजामातांचे विचार, त्यांचे धैर्य आणि त्यांचे मातृत्व आपल्याला प्रेरणा देत राहते. जिजामातांचे जीवन आजच्या तरुणांना आत्मनिर्भरता आणि मातृभूमीप्रती कर्तव्याची आठवण करून देते. त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात अनेक महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबवले जातात.
विनम्र अभिवादन
जय जिजाऊ!
जय शिवराय!
जय स्वराज्य!
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
