भारतीय संसदेच्या उच्च सभागृहात म्हणजेच राज्यसभेत उपराष्ट्रपती C. P. Radhakrishnan यांनी अध्यक्ष म्हणून ७ आम आदमी पक्ष (AAP) खासदारांचा (BJP) भारतीय जनता पक्षा मध्ये विलय मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्यसभेतील भाजपची ताकद १०६ वरून थेट ११३ वर पोहोचली आहे. नुकतेच राघव चढ्ढा यांच्या सह अन्य ६ आप च्या खासदारांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश घेतला होता.

कोण आहेत हे ७ AAP खासदार?
भाजपमध्ये अधिकृतपणे समाविष्ट झालेल्या खासदारांमध्ये खालील प्रमुख नावे आहेत:
- राघव चड्ढा
- अशोक कुमार मित्तल
- हरभजन सिंग
- संदीप कुमार पाठक
- डॉ. विक्रमजीत सिंह साहनी
- स्वाती माळीवाल
- राजिंदर गुप्ता
या सर्वांनी २४ एप्रिल रोजी AAPचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्या विलयाला औपचारिक मान्यता मिळाल्याने ते भाजपच्या राज्यसभा खासदारांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.
भाजपासाठी राजकीय परिणाम काय?
या निर्णयामुळे राज्यसभेत भाजपची संख्यात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. जरी राज्यसभेत पूर्ण बहुमत अजूनही आव्हानात्मक असले, तरी ११३ सदस्यांची संख्या सरकारला महत्त्वाच्या विधेयकांवर अधिक मजबूत भूमिका घेण्यास मदत करू शकते.
AAPसाठी मोठा धक्का
या घडामोडीमुळे आम आदमी पक्ष ला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या सात महत्त्वाच्या चेहऱ्यांनी एकाचवेळी पक्ष सोडल्याने AAPच्या राष्ट्रीय स्तरावरील उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुढे काय?
राजकीय विश्लेषकांच्या मते, या घटनेमुळे आगामी काळात राज्यसभेतील समीकरणे बदलू शकतात. तसेच, इतर विरोधी पक्षांवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. संसदेत सरकारची धोरणे आणि विधेयके अधिक वेगाने पुढे नेण्यास हा बदल महत्त्वाचा ठरू शकतो.
समाज माध्यमावरील प्रतिक्रियेसाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट :
