महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ संदर्भात महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. या शुद्धीपत्रकानुसार पूर्वी ऑनलाइन संगणक प्रणाली (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आलेली परीक्षा आता पुन्हा ऑफलाइन OMR आधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची मागणी आणि प्राप्त निवेदनांचा विचार करून अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून परीक्षा दिनांकही जाहीर करण्यात आले आहेत.

MPSC परीक्षा ऑफलाइन OMR पद्धतीने
आयोगाने स्पष्ट केले आहे की महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ ही पूर्वीप्रमाणे ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीने आयोजित केली जाईल. त्यामुळे उमेदवारांना संगणक आधारित परीक्षा (CBT) देण्याची आवश्यकता राहणार नाही. हा निर्णय उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा व निवेदनांचा विचार करून घेण्यात आला आहे.
परीक्षा दिनांक जाहीर
शुद्धीपत्रकानुसार परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे –
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६ : २७ सप्टेंबर २०२६
- शुद्धलेखन परीक्षा : ०४ ऑक्टोबर २०२६
- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – २०२६ : २७ डिसेंबर २०२६
MPSC Exam अर्ज भरण्याची मुदत वाढली
आयोगाने अर्ज सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत : ३१ जुलै २०२६, रात्री ११:५९ वाजेपर्यंत
- परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : ०३ ऑगस्ट २०२६, रात्री ११:५९ वाजेपर्यंत
यासोबतच आयोगाने चलनाद्वारे शुल्क भरण्याची सुविधा बंद असल्याचे स्पष्ट केले असून शुल्क केवळ ऑनलाइन माध्यमातून (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI) भरावे लागेल.
जिल्हा केंद्र निवडीसाठी स्वतंत्र प्रक्रिया
ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज सादर केला आहे, त्यांनी परीक्षा केंद्र (जिल्हा केंद्र) निवडणे बंधनकारक आहे. यासाठी आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीतील “My Account” विभागामध्ये जाऊन संबंधित जाहिरातीतील “View” पर्यायातून “Center Selection” वर क्लिक करून केंद्राची निवड करावी आणि “Apply & Submit” करावे.
जिल्हा केंद्र निवडीसाठी कालावधी पुढीलप्रमाणे आहे –
- १९ जुलै २०२६, दुपारी २:०० पासून
- ३१ जुलै २०२६, रात्री ११:५९ पर्यंत
ज्यांनी आधीच परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना पुन्हा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
MPSC आयोगाच्या महत्त्वाच्या सूचना
- जिल्हा केंद्र निवड न केल्यास अर्जामधील पत्रव्यवहाराचा पत्ता लक्षात घेऊन परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येईल.
- निवडलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची क्षमता पूर्ण झाल्यास जवळच्या दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देण्यात येऊ शकते.
- एकदा निश्चित केलेल्या जिल्हा केंद्रात किंवा परीक्षा उपकेंद्रात कोणताही बदल करण्यात येणार नाही.
- शुद्धीपत्रकात नमूद केलेल्या बाबी वगळता मूळ जाहिरातीतील इतर सर्व अटी व शर्ती पूर्ववत लागू राहतील.
उमेदवारांनी काय करावे?
ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज भरलेला नाही त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत वेळेत अर्ज पूर्ण करावा. तसेच अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी जिल्हा केंद्र निवडण्याची प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. परीक्षा ऑफलाइन OMR पद्धतीने होणार असल्याने त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करून वेळेत तयारी पूर्ण करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
अधिकृत शुद्धीकरण पत्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचे अन्य ब्लॉगपोस्ट
